Posts

Showing posts with the label व्यक्तीविषयक लेख

आठवणीतील गो. मा. पवार सर

Image
.      ( १६.०४.२०२०)      आज डॉ गो. मा. पवार सरांचा पहिला स्मृतिदिन. त्यांच्या नसण्याचे रितेपण माझ्यासह कित्येकांना अस्वस्थ करत असावे. काळ खूप वेगाने पुढे पुढे सरकत राहतो आणि लगतच्या भूतकाळातील आठवणी देखील निसटत जातात. प्रत्येकाच्या जीवनप्रवासात अशा व्यक्तींच्या सहवासाने आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्नता लाभलेली असते. मात्र नेहमीच्या रुटीन कामाच्या घाईगर्दीमुळे या व्यक्तींच्या आठवणी धूसर होत जातात. त्यावर वर्तमानाची पुटे साचत जातात. मात्र नेणीवेत दबा धरून बसलेल्या भावसंबंधाच्या आठवणी अपराधभावाने व्याकुळ करतात. तसेच रितेपणाच्या जाणीवेने अस्वस्थही करतात.              भाषासाहित्याचे नामवंत प्राध्यापक , साक्षेपी समीक्षक आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनकार्याचे निष्ठावान अभ्यासक अशी त्यांची ओळख.या त्यांच्या काही आठवणी, अर्थात त्या केवळ गतस्मरण स्वरूपाच्या नाहीत. सरांच्या या आठवणीतून त्यांच्या दृष्टिकोणावर व काळस्वभावावर देखील प्रकाश पडेल. 1999 साली मी सरांच्या संपर्कात आलो तेंव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत निरंत...

ज्ञानव्रती प्रा. वसंत पापळकर

Image
(३१.०३.२०१९)  तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक प्रा. वसंत पापळकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी बार्शी येथे दुःखद निधन झाले. त्यांचा जन्म व शिक्षण विदर्भात झाले. त्यानंतर नोकरी निमित्ताने त्यांचे कायमचे बार्शीत वास्तव्य घडले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ शिवाजी महाविद्यालयात काम केले. विद्यार्थिप्रेमी शिक्षक म्हणून शैक्षणिक क्षेत्रांत त्यांच्याकडे नेहमीच आदरभावाने पाहिले गेले.  विज्ञानातील तत्त्वज्ञान हा त्यांचा विशेष अभ्यासाचा प्रांत होता. भारतीय दर्शनांचा त्यांनी नवा अर्थ लावला. शंकराचार्य, वेदांत, न्यूटन ते आइन्स्टाइन ही त्यांची शोधयात्रेच्या विसाव्याची केंद्रे होती. त्यांनी मराठी संतपरंपरेचा कालोचित अर्थ लावला.                अध्यापनाबरोबर  संस्थात्मक पातळीवर देखील त्यांनी काम केले. बार्शीच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते. बार्शी येथे संपन्न झालेल्या 54 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. एवढेच नव्हेतर या संमेलनात ' कविता- असणे व होणे ' या त्यांच्या ...